Carry Dead Body In Hand In Thane : रस्त्याअभावी मृतदेह हातावर नेण्याची वेळ; खालिंग खुर्द गावातील वास्तव

Carry Dead Body In Hand In Thane : रस्त्याअभावी मृतदेह हातावर नेण्याची वेळ; खालिंग खुर्द गावातील वास्तव
रस्ता नसल्याने गावातील एका व्यक्तीचे निधन झाल्याने त्यांची अंत्ययात्रा १० फूट उंच असलेल्या पाईपलाईनवरील अरुंद रस्त्यातून गावकरी अंतयात्रा नेत असल्याचे धक्कादायक आणि तेवढेच भयाण वास्तव व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. खालिंग खुर्द गावात मरणानंतरही मरण यातना या नागरिकांच्या नशिबी आल्याचे दिसून येत आहे.
ठाणे : लाईनच्या त्या अरुंद रस्त्यावरून जाताना तिरडीवरील प्रेत खाली पडून त्यांची विडंबना होऊन नये म्हणून दोनच गावकरी तिरडी हातात धरून जाताना दिसून आले आहे. हे भयाण वास्तव भिवंडी तालुक्यातील खालिंग खुर्द गावात असल्याचे समोर आले असून या गावातील बौद्ध स्मशानभूमी पाईपलाईनच्या पलीकडे असल्याने त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याची मुंबई महापालिकेच्या संबधित विभागाकडे मागणी अनेक वर्षांपासून गावकऱ्याकडून केली जात आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
गावकऱ्यांकडून रस्त्याची मागणी : भिवंडी तालुक्यातून तानसा जल प्रकल्पच्या पाईपलाईन लगत असलेली बौध्द स्मशानभूमी व तसेच 'खालिंग खुर्द, गाव आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमुळे रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांची अंत्ययात्रा त्रास सहन करत मोठ्या जिकरीने घेऊन जावे लागते. यामुळे मृतदेहाची विटंबना सतत होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या अडीअडचणी समजून 'उत्कर्ष मानव सेवा संस्थेच्या वतीने मुंबई महापालिका मुख्य कार्यालयातील संबधित अधिकाऱ्याकडे रस्त्याच्या मागणीसाठी विनंती अर्ज करण्यात आले.
त्रास सहन करण्याची वेळ : अर्जात नमूद केले की बौध्द सम्शाभूमी आणि शेतजमीनकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. खळबळजनक बाब म्हणजे उन्हाळा आणि पावसाळ्यात तर मृतदेहावर अंतिमसंस्कार करण्याकरिता चार ते पाच पाईपलाईनच्या खालून गावकऱ्यांना प्रेत घेऊन जावा लागत असल्याचे सांगण्यात आले. तर काही जुन्या १० फूट उंच पाईपलाईन वरून चढ-उतार करायला केवळ अरुंद पायऱ्या आहेत, अशा वेळी मृतदेह खांद्यावर न घेता हातात घेण्याची बिकट वेळ येते. अनेक वर्षापासून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
मरणयातनेतून सुटका होईल का? स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उभारण्याची मागणी उत्कर्ष मानव सेवा संस्थेच्या पदाअधिकारी, कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून सतत अर्ज करीत आहेत. मात्र, मुंबई महापालिकेच्या संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्याची कुठली दखल घेतली नसल्याचा आरोप उत्कर्ष मानव सेवा संस्था अध्यक्ष धनंजय जाधवसह गावातील बौध्द वस्तीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी केला आहे. एकंदरीत एकीकडे ७५ व्या अमृत मोहत्सव सरकारच्या वतीने मोठ्या उत्सवात देशभरात साजरा होत असतानाच, खालिंग खुर्द गावात मरणानंतरही मरण यातना या नागरिकांच्या नशिबी आल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : Sherlyn Chopra vs Rakhi Sawant : राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा
