Satara Riot News: दंगलीतील मृत तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी १३ तासांनी घेतला ताब्यात, साताऱ्यात विविध संघटनांचा मूक मोर्चा

Satara Riot News: दंगलीतील मृत तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी १३ तासांनी घेतला ताब्यात, साताऱ्यात विविध संघटनांचा मूक मोर्चा
Satara Riot News : साताऱ्यातील पुसेसावळी गावात उसळलेल्या दंगलीत एका तरूणाचा मृत्यु झालाय. दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आश्वासन दिलंय. त्यानंतरच त्या तरूणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात (Satara Riot youth death) घेतलाय. दरम्यान, जिल्ह्यातील इंटरनेट सेवा अजूनही बंदच आहे.
सातारा Satara Riot News : खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात रविवारी रात्री जमावानं केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल १३ तासांनंतर नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय. मुख्य सूत्रधाराला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका जमावानं घेतली होती. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झालाय.
भाजपा पदाधिकाऱ्यावर आरोप : दंगलीत तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे या दंगलीचे सूत्रधार असल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलं, त्यानंतर १३ तासांनी नातेवाईकांनी तरूणाचा मृतदेह ताब्यात (Satara Riot youth death) घेतलाय.
२०० जणांवर दंगलीचा गुन्हा : दंगलीत तरूणाच्या झालेल्या मृत्यूमुळं सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमला होता. तक्रार देण्यासाठी शिष्टमंडळानं पोलिस अधीक्षकांची भेट घेतलीय. चर्चेअंती पुरवणी जबाबात भाजपाचे पदाधिकारी विक्रम पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानं तरूणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतलाय. दंगलीत जखमी झालेल्या सर्फराज बागवान यांच्या फिर्यादीवरून औंध पोलीस ठाण्यात तब्बल २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात (Satara Riot News Silent march) आलाय.
फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी : दंगलीच्या घटनेनंतर साताऱ्यात विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची तसंच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांना अटक करण्याची मागणी केलीय. पुसेसावळी येथे गेल्या तीन महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांसंदर्भात पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यामुळं हा हल्ला झालाय, असा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनात केलाय.
तांत्रिक पद्धतीने तपास : उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यात सध्या शांतता असल्याचं सांगितलंय. पुसेसावळीतील घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केलीय. एसपी आणि पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यामुळं परिस्थिती आटोक्यात आलीय. दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. सायबर क्राईमची टीम देखील तांत्रिक पद्धतीनं तपास करत असल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलंय.
हेही वाचा :
