Farmer Suicide in Satara : साताऱ्यातील वाईमध्ये शेतकरी दाम्पत्याची 'या' गंभीर कारणामुळे आत्महत्या

author img

By

Published : Sep 23, 2022, 10:33 AM IST

farmer couple commits suicide in wai in Satara

मूल होत नसल्याच्या नैराश्यातून शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (farmer couple commits suicide in wai in Satara) धक्कादायक घटना वाई तालुक्यातील कणूर गावातून समोर आली आहे.

सातारा : मूल होत नसल्याच्या नैराश्यातून शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (farmer couple commits suicide in wai in Satara) धक्कादायक घटना वाई तालुक्यातील कणूर गावातून समोर आली आहे. तानाजी लक्ष्मण राजपुरे (वय ४०) आणि पूजा तानाजी राजपुरे (वय ३६), अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे (farmer couple suicide due to childlessness) आहेत.


मुंबईतून गावी आल्यानंतर करत होते शेती - तानाजी राजपुरे हा काही वर्षे मुंबईत माथाडी कामगार म्हणून काम करत होता. त्यानंतर गावी कणूर येथे येऊन राजपुरे दाम्पत्य शेती करत होते. लग्नाला बरीच वर्षे होऊनही त्यांना मूल होत (suicide due to childlessness) नव्हते. या नैराश्यातूनच या दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे पोलिसांनी (farmer couple commits suicide) सांगितले. पोलीस पाटील सूरज जठार यांनी या घटनेची खबर दिली. त्यावरून घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून वाई पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.