Gopichand Padalkar on Ahilyanagar : 'अहमदनगर' जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर'करा, गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

author img

By

Published : Jun 2, 2022, 1:43 PM IST

Updated : Jun 2, 2022, 2:27 PM IST

Ahmednagar name change demand Gopichand Padalkar

अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यानगर' ( Gopichand Padalkar on Ahilyanagar ) करावे अशी मागणी ( Ahmednagar name change to Ahilyanagar demand ) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Gopichand Padalkar letter to CM ) यांना पाठवले आहे.

सांगली - अहमदनगरचे नाव बदलून 'अहिल्यानगर' ( Gopichand Padalkar on Ahilyanagar ) करावे अशी मागणी ( Ahmednagar name change to Ahilyanagar demand ) भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या मागणीचे पत्र पडळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Gopichand Padalkar letter to CM ) यांना पाठवले आहे. तसेच नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल, असे आवाहन देखील पडळकर यांनी केली.

बोलताना भाजप नेते गोपीचंद पडळकर
Ahmednagar name change demand Gopichand Padalkar
पत्र

हेही वाचा - Sangli Crime News : कानाखाली मारल्याच्या रागातून अंडाभुर्जी चालकाचा खून; पाच आरोपी ताब्यात

आमदार गोपीचंद पडळकर ( Ahmednagar name change demand Gopichand Padalkar ) यांनी पत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा उल्लेख करत नामांतराची मागणी केली आहे. पत्रात, अहिल्यादेवी होळकर या संपूर्ण देशाच्या प्रेरणास्थान आहे. मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती, मंदिरे लुटली जात होती तेव्हा अहिल्यादेवींनी हिंदूसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवींचा ज्या जिल्ह्यात जन्म झाला त्या अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करावे अशी लोकभावना आहे. त्यामुळे, तुम्ही कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार, मुघलशाही की होळकरशाही, असा प्रश्न विचारत पडळकर यांनी नामांतराच्या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

पत्रातून शरद पवार यांच्यावर टीका - नुकतेच अहमदनगर येथील चौंडीमध्ये अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवार उपस्थित होते. याच दिवशी भाजप नेते गोपींचंद पडळकर यांना पोलिसांनी चौंडीत थांबवले. यावरून वाद झाला होता. या घटनेचाही उल्लेख पत्रात करून पवार यांच्यावर टीका झाली आहे. पवारांनी मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडीत रोखले असा आरोप पडळकर यांनी केला आहे. तसेच, पवारांना अहिल्यादेवी यांचा कार्यक्रम नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो, अशी टीका देखील केली आहे.

स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा - अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ते अहिल्यानगर करण्याची मागणी पडळकर यांनी केली. यावेळी त्यांनी, मुख्यमंत्र्यांवरही टीका केली. नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झाला आहे, संघटीत झाला आहे, लक्षात ठेवा, असा इशारा पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली, म्हणाले...

Last Updated :Jun 2, 2022, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.