जायकवाडी धरण ६५ टक्के भरले.. नाशिक-नगर जिल्ह्यांना दिलासा

author img

By

Published : Sep 19, 2021, 3:46 PM IST

Jayakwadi Dam

मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण ६५ टक्के भरले असून मेंढिगिरी समितीच्या निकषानूसार आता नाशिक व नगरमधील धरणांमधून पाणी सोडणे आता बंधनकारक नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला दिलासा मिळला आहे.

नाशिक - मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण ६५ टक्के भरले असून मेंढिगिरी समितीच्या निकषानूसार आता नाशिक व नगरमधील धरणांमधून पाणी सोडणे आता बंधनकारक नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला दिलासा मिळला आहे. जिल्ह्यातील धरणात ८० टक्के जलसाठा उपलब्ध असून वर्षभराचा पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचन व उद्योगांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

आता नाशिक व नगरमधील धरणांमधून पाणी सोडणे बंधनकारक नाही -

ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यावर जलसंकटाचे ढग गडद झाले होते. जिल्ह्यातील धरणांत अवघा ६९ टक्के जलसाठा शिल्लक होता. वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता जरी मिटली असली तरी सिंचन व उद्योगासाठी पाणी आरक्षित ठेवणे शक्य नव्हते. त्याहून मोठे संकट म्हणजे जायकवाडी धरणात जेमतेम ५० टक्के जलसाठा होता. मेंढिगरी समितीच्या शिफारशीनुसार जायकवाडी धरणात ६५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यास नाशिक व नगरमधील धरणांतून पाणी सोडणे बंधनकारक आहे. पावसाने दिलेली ओढ व जिल्ह्यातील धरणातील उपलब्ध जलसाठ‍ा बघता मराठवाड्याला पाणी सोडणे अशक्य ठरले असते. मात्र पावसाने ऑगस्टची कसर सप्टेंबरच्या प्रारंभी भरुन काढली.

हे ही वाचा - गडचिरोलीतील सूरजागड लोह खनिज प्रकल्पाला मजूर पुरवठा करणाऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या

पाणी सोडण्यातून दोन जिल्ह्यांची सुटका -

धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेलया जोरदार पावसामुळे गंगापूर, दारणा व नांदूर धरणातून जायकवाडीकडे ३३ हजार क्यूसेस वेगाने विसर्ग सुरू होता. सलग तीन दिवस धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु होता. तसेच नगरमधील निळवंडे व भंडारदरा ही धरणे ओव्हर फ्लो झाली. या दोन्ही धरणांतून जायकवाडीला हजारो क्यूसेस वेगाने विसर्ग सुरु होता. नाशिक व नगरमधील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने जायकवाडीच्या जलपातळीत झपाट्याने वाढ झाली. जायकवाडी धरण आता ६५ टक्के भरले व नाशिकसह नगरने सुटकेचा निश्वास सोडला. मेंढगिरी समितीच्या निकषानुसार जायकवाडीसाठी पाणी सोडण्यातून दोन्ही जिल्ह्यांची सुटका झाली आहे. नाशिक जिल्ह्याच्या धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा वर्षभर पुरेपुर वापर करता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.