Nagpur Surat Highway Flood : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, नद्यांना पूर आल्याने पूल पाण्याखाली

author img

By

Published : Jul 12, 2022, 10:51 AM IST

Nandurbar Rain

राज्यात मुसळधार पाऊस (Heavy rains in the state) सुरू असल्याने अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आहे. यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले आहे. अशात आता विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प (Nagpur Surat Highway Transport) झाल्याची माहिती समोर येत आहे.

नंदुरबार : नवापूर तालुक्यात (Navapur taluka) दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची (Heavy rains) संततधार असल्याने (Nandurbar Rain Update) नदी-नाल्यांना पूर आला आहे. सरपणी नदीसह नागन व नेसू नद्यांना मोठा पूर आल्याने पूलावरुन पाणी वाहू लागले आहे. यामुळे नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक पूर्णत बंद झाल्याने दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच पिंपळनेर ते चरणमाळमार्गे जाणारा रस्ता देखील बंद झाला असून साक्री ते पिंपळनेर मार्गावरील कान नदीला पूर आल्याने पूलावरील वाहतुक बंद झाली आहे. प्रशासनाने महामार्गावरील वाहतुक उच्छल-दहिवेल-नंदुरबार मार्गे (Uchhal Dahivel Nandurbar)वळविण्यात आली आहे. दरम्यान, नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो म्हणून या संदर्भात प्रशासनाने उपाययोजनाच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

प्रशासनाचे सर्व नागरिकांना आवाहन - नवापूर तालुक्यातील खोकसा धरण भरले आहे. रंगावली धरणातल्यी पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास रंगावली नदीला रात्रीच्या दरम्यान महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या संदर्भात पालिका व महसूल प्रशासन सज्ज झाले आहे. नदी काठच्या नागरिकांच्या संरक्षणाच्या हेतूने नागरिकांचे स्थलांतर करण्याचे निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तरी याद्वारे नदीकाठी राहणाऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले मौल्यवान सामान, महत्वाचे कागपत्रे, तसेच अन्य महत्वाचे साहित्यांसह इदगाह रोड, सार्वजनिक हॉल/शासकीय विश्रामगृह या ठिकाणी स्थलांतरित व्हावे तसेच आवश्यकतेनुसार नगरपालिका टाऊन हॉल, अग्रवाल भवन आणि हनुमान वाडी या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात येईल. अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी (Tahsildar Mandar Kulkarni) यांनी दिली.

नंदुरबार पूर

कोळदा रेल्वेरुळ पाण्याखाली - सरपणी नदीला पूर आल्याने या पूराच्या पाण्याखाली नवापूर तालुक्यातील कोळदा येथील रेल्वेस्थानकाचा रेल्वे रुळ पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कोळदे रेल्वेस्थानक परिसर जलमय झाला असून रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. यामुळे रेल्वे रुळ पाण्याखाली असल्याने सुरत-भुसावळ या लोहमार्गावरुन मार्गस्थ होणार्‍या पॅसेंजर रेल्वे गाड्यांसह सर्वच गाड्या हळुवारपणे मार्गस्थ होत आहे.




पडझड घरांची शेती नुकसानींचे पंचनामे करण्याचे आवाहन - नवापूर तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक गावांमध्ये घरांची पडझड होवून नुकसान झाले आहे. तसेच शेतीपिके देखील पाण्यात गेली असून शेतकर्‍यांना पिक नुकसानीचा फटका बसला आहे. ढोरपाडा येथील पोहल्या गावित यांच्या घराची पडझड झाली असून त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. तसेच आमलाण येथे 4 घरे, चेडापाडा येथे 1, चिंचपाडा येथे 2, खानापूर येथे 1, वडफळीत 2, भादवड 5, मोग्राणीत 2, बंधारपाड्यात 1, पायविहीर -1, कळवान -1, खांडबारा-3 घरांची पडझड झाली आहे. तसेच पानबारा, सोनखांब, मोरकरंजा, तिळासर, जामनपाडा या गाव शिवारातील शेती पिके पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले आहे. या नुकसानींचे पंचनामे करण्याचे आवाहन महसुल विभागाला देण्यात आले आहे.


जिल्हाधिकार्‍यांसह तहसिलदारांकडून पाहणी - नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ असलेल्या पर्यायी कच्चापूल सरपणी नदीला आलेल्या पूराच्या पाण्याखाली गेल्याने महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मनिषा खत्री व नवापूरचे तहसिलदार मंदार कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट घेवून पाहणी केली. तसेच महामार्गावरील ठप्प झालेली वाहतुक सुरळीत करण्यासाठी संबंधीत विभागास सूचनाही केल्या. तसेच नदी-नाल्यांच्या ठिकाणी सेल्फी किेंवा फोटोग्राफी काढू नये. मासेमारी करण्यासाठी कोणी जावू नये असे आवाहन नवापूरचे तहसिलदार मंदार कुलकर्णी (Tahsildar Mandar Kulkarni) यांनी केले आहे.


2018 ची झाली आठवण - १६ ऑगस्ट २०१८ रोजी रंगावली नदीला महापूर आला होता. त्यात शहरातील चार पूल पाण्याखाली गेले होते नदीकिनारी असलेले नागरिकांच्या घरांची पडझड झाली. पाच जणांचा मृत्यू झाला होता. हे लक्षात घेता तालुका प्रशासनाने रंगावली नदी किनारी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : Maharashtra weather forecast: कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी

हेही वाचा : India Floods : गुजरात, आसाम, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेशसह जवळपास अर्धा देश पुराच्या विळख्यात

हेही वाचा : Maharashtra Breaking News : नांदेड जिल्ह्यात लेंडी नदीच्या पुरात वाहून महिलेचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.