गंगा नदीत वाहून गेलेले मृतदेह हिंदूचे नव्हते का, मंत्री ठाकूर यांचा केंद्राला सवाल

author img

By

Published : Aug 8, 2021, 6:46 PM IST

Updated : Aug 8, 2021, 7:08 PM IST

यशोमती ठाकूर

चाय मे बिस्कीट नही पुरा देश डूब रहा है, अशा शब्दात मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे.

नंदुरबार - केंद्रातील भाजप सरकार हे हिंदू विरोधी असून गंगा नदीत वाहून गेलेले मृतदेह हे हिंदूचे नव्हते का, असा प्रश्न राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. 'चाय मे बिस्कीट नही, पुरा देश डूब रहा है, असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला.

बोलताना मंत्री ठाकूर

राम तेरी गंगा मैली हो गई

भाजप सरकार केवळ टीका करत असते. त्यांच्यावर काहीही टीका केली तर केवळ जय श्री राम म्हणतात. पण, केंद्राचे भाजप सरकार हे हिंदू विरोधी सरकार असून राम ते गंगा मैली हो गई म्हणण्याची वेळ आली आहे. गंगा नदीत वाहून गेलेले मृतदेह हे हिंदूचे नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला. महाआघाडी सरकार आकडे लपवत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चाय मे पुरा देश डूब रहा है

चाय में बिस्किट नही तो पुरा देश ही डूब रहा है, अशा भाषेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस आयोजीत व्यर्थ न हो बलिदान या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरुन त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक डॉ. पितांबर सरोदे व डॉ. काकडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या परिवारातील व्यक्तींचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - शहादामधून दुधाचे 100 कॅन चोरी करणारी टोळी जेरबंद, चौघांना अटक

Last Updated :Aug 8, 2021, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.