चंद्रकांत पाटलांना लाज वाटली पाहिजे, हसन मुश्रीफ यांची टीका

author img

By

Published : Sep 9, 2021, 7:37 PM IST

Ambeohol Project pani pujan Program

आंबेओहोळ प्रकल्पाबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. प्रकल्पाचे काम गेली दहा वर्षे रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका मुश्रीफ यांनी केली.

कोल्हापूर - आंबेओहोळ प्रकल्पाचे काम गेली दहा वर्ष रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

माहिती देताना ग्रामविकास मंत्री आणि जलसंपदामंत्री

हेही वाचा - कोल्हापुरात मुसळधार; राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

तुम्ही दहा वर्षे आमदार असताना हा प्रकल्प का रखडला? असा सवालही मुश्रीफ यांनी केला. आज आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाचे आज पाणी पूजन कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला.

प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होणार

आंबेओहोळ या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेती सुजलाम-सुफलाम बनेल. या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाचे काम करण्यासाठी मुश्रीफ हे प्रयत्न करत आहेत. याचे सर्व श्रेय त्यांना मिळायला हवे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

रखडलेला प्रकल्प मार्गी लागल्याचा आनंद

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प आज मार्गी लागत आहे, याचा आनंद आहे. शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जाईल. जोपर्यंत शेवटच्या प्रकल्पग्रस्तला मदत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.

श्रेयवादासाठी पोस्टरबाजी

आंबेओहोळ हा प्रकल्प पहिल्यापासूनच राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आज याचे पाणी पूजन कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. मात्र, यासाठी भाजपने निधी मंजूर केला असल्याचा पोस्टर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समर्जित घाटगे यांनी लावला आहे. तर, त्याच्या बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुश्रीफ यांच्या आभाराचे पोस्टर लावल्याने श्रेय वादाची पोस्टरबाजी, अशी चर्चा रंगू लागली आहे.

हेही वाचा - VIDEO : कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रंगकर्मींचे अनोखे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.