सरकारने बसून घोषणा करू नये, एकाही शेतकऱ्याला तातडीचा पंचनामा नाही- अजित पवार

author img

By

Published : Jul 28, 2022, 9:24 AM IST

Updated : Jul 28, 2022, 9:46 AM IST

अजित पवार

बळीराजाचे नक्की दुखणे काय हे समजून घेतले पाहिजे. सरकाने बसून घोषणा करू नये, एकाही शेतकऱ्याला तातडीची मदत नाही. पंचनामा देण्यात आली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar visit Gadchiroli ) यांनी केली.

गडचिरोली- बळीराजाचे नक्की दुखणे काय हे समजून घेतले पाहिजे. सरकाने बसून घोषणा करू नये, एकाही शेतकऱ्याला तातडीची मदत नाही. पंचनामा देण्यात आली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar visit Gadchiroli ) यांनी केली. अजित पवार तीन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतकऱ्याला आणि सामान्य नागरिकाला तातडीने मदतीची गरज असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दौरा करून पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप मदत दिली गेलेली नाही. सत्तास्थापन करूनही अनेक दिवस उलटून गेले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

प्रश्न अधिवेशनात लावून धरु असा इशारा-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Former Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मुलाखत द्यायची आणि त्यानंतर त्यांच्यावर वक्तव्य करत हल्ला चढवायचा, यातून राज्याचे प्रश्न सुटणार नाही. तसेच राज्यात 10 लाख हेक्टर शेत पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना जी भरीव मदत मिळायला पाहिजे होती, ती अद्याप मिळाली नसल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या ( farmer ) बांधावर जाणून घेऊन प्रश्न अधिवेशनात लावून धरु असा इशारा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नागपुरात दिला आहे. ते 3 दिवसीय नागपूर, ( Nagpur Airport ) विदर्भाच्या दौऱ्यावर ( Vidarbha tour ) असून ते माध्यमांशी नागपूरात बुधवारी बोलत होते.

राज्याचा कारभार योग्यरित्या होत नाही महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्याचा कारभार केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करणे अशक्य आहे. प्रत्येक विभागाचे निर्णय घेण्यासाठी संपूर्ण दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निर्णयांवर सह्या कराव्या लागल्या तरीही ते शक्य होणार नाही एवढा प्रचंड कामाचा पसारा असतो. यामुळेच अनेक निर्णय खोळंबून राहतात राज्याचा कारभार योग्यरित्या होत नाही असा टोला विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे सरकारला लगावला आहे.

Last Updated :Jul 28, 2022, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.