CM Eknath Shinde Gadchiroli : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला गडचिरोलीतील पूरपरिस्थितीचा आढावा

author img

By

Published : Jul 11, 2022, 7:56 PM IST

Updated : Jul 11, 2022, 8:18 PM IST

CM Eknath Shinde Gadchiroli

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis ) गडचिरोलीत दाखल झाले आहे. त्यांनी जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाण्याची पातळी आणि उपाययोजनांची माहिती दिली आहे.

गडचिरोली - जिल्ह्यात ( Torrential Rains in Gadchiroli ) सध्या पूर परिस्थिती ( Gadchiroli flood situation ) निर्माण झालेली आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. याच स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis ) गडचिरोलीत दाखल झाले आहे. त्यांनी जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावरील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाण्याची पातळी आणि उपाययोजनांची माहिती दिली आहे.

पूरपरिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

'या' तालुक्याला फटका : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाने कहर केला असून याचा सर्वाधिक फटका दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आहेरी तालुक्याला बसला आहे. मुख्यालय मार्गावरील नाल्यातून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली तर गडचिरोलीला आजपासुन पुढील तीन दिवस हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर पेरमिली गावाजवळच्या नाल्यावरुन एक ट्रक व तीन प्रवासी पुरात वाहुन गेले आहेत. चालकांचा शोध चालू आहे. भामरागड आलापल्ली मार्गावरील कुमरगुडा नाल्यावरील नवीन ब्रीज बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी पर्याय मार्ग वाहुन गेल्याने स्थानिक प्रशासानाकडुन युध्द पातळीवर दुरुस्ती करुनही तीन दिवसांत तीनदा वाहने वाहुन गेली आहे. तीन दिवसापासून दिवसभर वाट बघत नाल्यावर अडकून पडले आहेत. तर ग्रामस्थासमोर जीव मुठीत धरुन नाला पार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भामरागड तालुक्यातील 60 ते 70 गावांना संपर्क तुटण्याची भीती आहे. कायमची उपाय योजना आखण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

  • Maharashtra CM Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis inspected the flood situation on the Wainganga river bridge in Armori taluka of Gadchiroli district. DM Sanjay Meena and Superintendent of Police Ankit Goyal briefed about the water level and measures. pic.twitter.com/c04z0MzlTG

    — ANI (@ANI) July 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पूरग्रस्त नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश : आम्ही स्थानीय प्रशासनाला पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांची कुठल्याही जीवित आणि मालमत्तेची हानी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासंबंधी एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी, एअर फोर्स यांचे सहकार्य घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याचे कार्य चालू आहे. आम्ही या संदर्भात एनडीआरएफ, नेव्ही, आर्मी, एअर फोर्स यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती :

पुणे : पुण्यामध्ये सोमवारी झालेल्या पावसामुळे खडकवासला धरणामध्ये सुमारे 61 टक्के, पानशेत धरणामध्ये 34 टक्के आणि वरसगाव धरणामध्ये 22 टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा जलसाठा 0.93 टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यामध्ये अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर पाणी साठत आहे. त्यामुळे शहरामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे.

नागपूर : नागपूर शहरात रविवारी दमदार पावसाने हजेरी ( Nagpur rains update ) लावली. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास नागपूरच्या पडोळे चौकात रिंगरोडवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक ( Nagpur traffic update ) बंद पडली. खोलगट भाग असल्याने पडोळे चौकातून प्रतापनगरच्या दिशेने जात असलेल्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला.


नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू ( continuous rains in Nashik ) आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील ( water storage in Nashik dams ) पाणी साठ्यात वाढ होत आहे. पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने पाण्याची पातळी वाढली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून पालखेड धरणातून 15 हजार 408 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात ( ​​Palakhed Dam water release ) सुरू आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल असे, जिल्हा प्रशासनाने सांगितलं आहे.

हेही वाचा - Heavy Rain In Gadchiroli : गडचिरोलीत तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा; शाळा, महाविद्यालय तीन दिवस राहणार बंद

Last Updated :Jul 11, 2022, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.