तहसील कार्यालयासमोर भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप; आठवडी बाजार सुरू करण्याची मागणी

author img

By

Published : Aug 30, 2021, 2:56 AM IST

Updated : Aug 30, 2021, 4:30 AM IST

भाजीपाला

दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कार्यालयासमोर भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला.

चंद्रपूर - भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरु करण्याच्या मागणीला घेऊन बल्लारपूर तहसील कार्यालयासमोर भाजीपाला फेकून सरकारच्या विरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला.

भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

कोरोना काळात मागील वर्षीपासून बाजारपेठा व आठवडी बाजार बंद असल्याने भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकर्‍यांनी पिकवलेल्या मालाला योग्य हमीभाव व आठवडी, दैनंदिन बाजारपेठ बंद असल्याने तोटा सहन करावा लागत आहे. एकीकडे सरकारने मोठमोठे मॉल, दारूची दुकाने व इतर व्यवसाय सुरू करण्याची सूट दिली असताना आठवडी बाजार तसेच दैनंदिन बाजार अजूनही बंद ठेवलेले आहेत. सरकार व प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे पिकवलेल्या शेतमालाला विकायचे कुठे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आठवडी बाजार व दैनंदिन बाजार सुरू असते तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून चार पैसे मिळाले असते. शेतकरी मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकवत आहे. परंतु आठवडी बाजार व दैनंदिन बाजार बंद असल्याने कवडीमोल भावात भाजीपाला विकावा लागत आहे. सरकार व प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. यावर सरकारने तत्काळ लक्ष देऊन भाजीपाला पिकणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी व त्यांच्या मालाला योग्य व रास्त भाव मिळण्याकरिता आठवडी बाजार व दैनंदिन बाजार तात्काळ सुरू करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला सरकार व प्रशासनाने केराची टोपली दाखवली तर या विरोधात जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करणार, असा इशारा राजू झोडे यांनी सरकार व प्रशासनाला दिला आहे.

हेही वाचा - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरे झोपडपट्टीमुक्त करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

Last Updated :Aug 30, 2021, 4:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.