भंडारा - भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात 3 तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अत्री गावात राहणारे हे तीन तरुण जिवलग मित्र होते. आज सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी गावातील बोडीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सायकल आणि कपडे बोडी शेजारी आढळून आल्या. Three youths of Pavani taluk drowne त्यानंतर त्यांचा शोध घेतल्यानंतर असता या तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले. प्रणय योगीराज मेश्राम, साहिल नरेश रामटेके, संकेत बालकदास रंगारी सर्व वय २० वर्ष असून आत्री येथील रहावसी आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने हे तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भंडारा - भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात 3 तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अत्री गावात राहणारे हे तीन तरुण जिवलग मित्र होते. आज सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी गावातील बोडीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सायकल आणि कपडे बोडी शेजारी आढळून आल्या. Three youths of Pavani taluk drowne त्यानंतर त्यांचा शोध घेतल्यानंतर असता या तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले. प्रणय योगीराज मेश्राम, साहिल नरेश रामटेके, संकेत बालकदास रंगारी सर्व वय २० वर्ष असून आत्री येथील रहावसी आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने हे तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.