पवनी तालुक्यातील तीन तरुणांचा छोट्या तलावात बुडून मृत्यू

author img

By

Published : Aug 29, 2022, 10:59 PM IST

पवनी तालुक्यातील तीन तरुणांचा छोट्या तलावात बुडून मृत्यू

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात 3 तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अत्री गावात राहणारे हे तीन तरुण जिवलग मित्र होते. Three youths of Pavani taluk drowne आज सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी गावातील बोडीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सायकल आणि कपडे बोडी शेजारी आढळून आल्या. त्यानंतर त्यांचा शोध घेतल्यानंतर असता या तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले.

भंडारा - भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात 3 तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अत्री गावात राहणारे हे तीन तरुण जिवलग मित्र होते. आज सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी गावातील बोडीमध्ये आंघोळीसाठी गेले होते. सायंकाळी घरी परत न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या सायकल आणि कपडे बोडी शेजारी आढळून आल्या. Three youths of Pavani taluk drowne त्यानंतर त्यांचा शोध घेतल्यानंतर असता या तीनही मुलांचे मृतदेह आढळून आले. प्रणय योगीराज मेश्राम, साहिल नरेश रामटेके, संकेत बालकदास रंगारी सर्व वय २० वर्ष असून आत्री येथील रहावसी आहेत. गावकऱ्यांच्या मदतीने हे तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.