Farmers Literature Conference : यंदा १० वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरीमध्ये
Published: Nov 16, 2022, 6:10 PM


Farmers Literature Conference : यंदा १० वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गुरुकुंज मोझरीमध्ये
Published: Nov 16, 2022, 6:10 PM
शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी यासाठी शेतकरी साहित्य संमेलनाचे ( Marathi Shetkari Sahitya Sammelan Organized at Gurukunj Mozri ) आयोजन करण्यात आले आहे. तसेच, लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस ( To Bring Happiness and Dignity in Lives of Farmers ) खेचून आणण्याकरिता याकरिता गुरुकुंज मोझरी सेवाश्रमाचे पावनभूमीत दोन दिवसीय 10 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ( Marathi Farmers Literature Conference Organized at Gurukunj Mozri ) आयोजित गुरुकुंज मोझरी येथे ( 10th All India Marathi Farmer Literature Conference ) आयोजित करण्यात आले आहे.
अमरावती : लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे ( 10th All India Marathi Farmer Literature Conference ) व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याकरिता शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी ( Shetkari Sahitya Sammelan Organized at Gurukunj Mozri ) म्हणून २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी गुरुकुंज मोझरी सेवाश्रमाच्या पावनभूमीत दोन दिवसीय दहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन ( To Bring Happiness and Dignity in Lives of Farmers ) आयोजित गुरुकुंज मोझरी येथे आयोजित ( Marathi Farmers Literature Conference Organized at Gurukunj Mozri ) करण्यात आले.
किशोर सानप भूषवणार अध्यक्षपद : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक किशोर सानप हे राहणार आहेत. तर शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेती उद्योगाला नवी दिशा देणारे नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या स्वागतध्यक्षपदी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांची निवड करण्यात आलेली आहे.
अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे भूषवणार पद : अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे तसेच वऱ्हाडी कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय विल्हेकर यांनी दिली. शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे.
असा राहिला साहित्य संमेलनाचा प्रवास : सन २०१५ मध्ये वर्धा येथे पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर २०१६ मध्ये दुसरे नागपूर येथे, तिसरे २०१७ मध्ये गडचिरोली, चौथे २०१८ मध्ये मुंबई, २०१९ मध्ये पाचवे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण, तर सहावे २०२० मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे २०२१ मध्ये पार पडले.
संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेत्यांची उपस्थिती : कोरोना काळात सातवे संमेलन ऑनलाईन पद्धतीने झाले, तर आठवे यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे पार पडले. तर नववे सप्टेंबर २०२२ मध्ये ऑनलाइन संमेलन आयोजित घेण्यात आले होते. संमेलनामध्ये उद्घाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल, मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविध अंगी सत्र असणार आहेत. संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ, अनुभवी वक्ते सहभागी होणार आहेत.
