IND vs SA 3rd T-20 : भारतासमोर आज मालिका वाचवण्याचे आव्हान, तर दक्षिण आफ्रिका मालिका जिंकण्यास सज्ज

author img

By

Published : Jun 14, 2022, 3:13 PM IST

IND vs SA

नवी दिल्ली आणि कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग सामने गमावल्यानंतर भारतावर मालिका गमावण्याचा धोका ( IND vs SA ) आहे. आता मंगळवारी येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.

विशाखापट्टणम: पाच सामन्यांच्या T20I मालिकेपूर्वी, T20 क्रिकेटमध्ये एका संघाने सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम असलेल्या सलग 13 विजयांचा विक्रम करण्यासाठी भारताला दावेदार मानले जात होते. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नवी दिल्ली आणि कटकमध्ये सलग सामने गमावल्यानंतर भारतावर मालिका गमावण्याचा धोका आहे. आता मंगळवारी येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याचा सामना दक्षिण आफ्रिकेशी ( IND vs SA 3rd T-20 ) होणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान आहे.

दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार ऋषभ पंतच्या ( Captain Rishabh Pant ) संघाला काही चांगल्या गोष्टी असूनही विजय मिळवण्यात अपयश आले आहे. कटक आणि विशाखापट्टणम T20I मध्ये फक्त एका दिवसाच्या अंतराने, भारताकडे मालिकेत परतण्यासाठी जास्त वेळ नाही. नवी दिल्लीत, गोलंदाजांना 212 धावांचा बचाव करता आला नाही, तर कटकमध्ये भुवनेश्वर कुमार वगळता एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही, परिणामी रविवारी चार विकेट्सने भारताने सामना गमावला.

फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Spinner Yuzvendra Chahal ) आणि अक्षर पटेल यांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली, कारण दोघांनीही सामन्यांमध्ये एकत्रितपणे 75 आणि 59 धावा दिल्या. चहल आणि पटेल यांना डेव्हिड मिलर, रॉसी व्हॅन डर ड्युसेन आणि हेनरिक क्लासेन यांच्यावर नियंत्रण ठेवता आले नाही, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाला धावा करण्याची संधी मिळाली.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने सर्व विभागांमध्ये चमकदार कामगिरी केली आणि या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये विशेषतः पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारताकडून एकही सामना गमावला नाही. त्यांच्यासाठी दोन्ही सामन्यांमध्ये नवे मॅचविनर्स उदयास आले आहेत. कर्णधार टेम्बा बावुमा ( Captain Temba Babuma ) क्रमवारीत वरच्या फळीत अधिक चांगला दिसत आहे आणि त्याने पारनेल, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्टजे, केशव महाराज आणि तबरेझ शम्सी यांसारख्या गोलंदाजांचा चांगला वापर केला आहे. दक्षिण आफ्रिका विशाखापट्टणमच्या मैदानावर आत्मविश्वासाने उतरेल तर भारत मालिकेच्या करो या मरोच्या इराद्याने मैदानात प्रवेश करेल.

भारतीय संघ : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टिरक्षक), दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन (यष्टिरक्षक), केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शम्सी, रॉसी व्हॅन डर डुसेन, मार्को जॅन्सेन आणि ट्रिस्टन स्टब्स.

हेही वाचा - BCCI Big Announcement : बीसीसीआयकडून माजी क्रिकेटपटू आणि पंचांना मोठी भेट; आता मिळणार तब्बल 'इतकी' पेन्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.