IND vs SA 2nd T20 : भारताची फलंदाजी ढेपाळली, दक्षिण आफ्रिकेला 149 धावांचे लक्ष्य

author img

By

Published : Jun 12, 2022, 9:23 PM IST

IND vs SA

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND vs SA ) संघात कटक येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 148 धावा केल्या आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघापुढे 149 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

कटक: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील आज दुसरा सामना ( IND vs SA 2nd T20 ) खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावांची माफक धावसंख्या उभारली. गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघापुढे 149 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम खेळणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाडची ( Batsman Rituraj Gaikwad ) विकेट गमावली. तो 1 धावा करून बाद झाला. येथून इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून दुसऱ्या विकेट्ससाठी 48 धावा जोडल्या. दरम्यान, इशान किशन 21 चेंडूत 34 धावा करून बाद झाला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याची बॅटही चालली नाही. दोघांनी अनुक्रमे 5 आणि 9 धावा केल्या.

श्रेयस अय्यरने चांगली फलंदाजी केली ( Shreyas Iyer batted well ), मात्र तो 35 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल यांनी शेवटच्या काही षटकांमध्ये चांगली फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. त्यामुळे भारताची धावसंख्या 6 बाद 148 झाली. कार्तिकने 21 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. हर्षल पटेलने 9 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका संघाकडून गोलंदाजी करताना नॉर्टजेने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. त्याचबरोबर पारनेल, रबाडा, प्रिटोरिस आणि महाराज यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.

हेही वाचा - Kiyg 2021: महाराष्ट्राच्या आदिती स्वामीने तिरंदाजीमध्ये पटकावले सुवर्णपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.