IPL 2022 Updates : प्लेऑफमध्ये पोहोचणार पहिला संघ ठरल्यानंतर, हार्दिक पांड्याचे मोठे वक्तव्य

author img

By

Published : May 11, 2022, 4:23 PM IST

Hardik Pandya

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 58 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सचा 62 धावांनी पराभव ( Gujarat Titans Beat Lucknow Super Giants ) केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने एक मोठे वक्तव्य केले आहे.

पुणे: आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या 58 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपरजायंट्सचा 62 धावांनी पराभव ( Gujarat Titans Beat Lucknow Super Giants ) केला. यासह गुजरात टायटन्स हा आयपीएलच्या पंधराव्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यानंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या ( Captain Hardik Pandya ) म्हणाला की, मला आमच्या संघाचा अभिमान आहे. त्याचबरोबर त्याने एक मोठे वक्तव्य केले.

पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 144/4 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपरजायंट्सचा संघ 13.5 षटकांत सर्वबाद 82 धावांवर आटोपला. त्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, त्याचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल यावर नेहमीच विश्वास होता. परंतु दोन सामने शिल्लक असताना प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल हे वाटले नव्हते. त्यामुळे ही एक मोठी उपलब्धी आहे.

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला ( Hardik Pandya said after the match ), 'खेळाडूंचा अभिमान आहे. जेव्हा आम्ही हा प्रवास एकत्र सुरू केला, तेव्हा आमचा स्वतःवर विश्वास होता. पण 14व्या सामन्यापूर्वी आम्ही पात्र ठरलो. हा एक चांगला प्रयत्न आहे आणि आम्हाला स्वतःचा अभिमान आहे. गेल्या सामन्यात, मी जाण्यापूर्वी मुलांशी खेळाडू सोबत बोललो होतो. सामना संपण्यापूर्वी मला वाटले, तो कधी संपला हे मला माहीत आहे.

तो पुढे म्हणाले, 'आम्ही हा धडा शिकलो आहोत. मला असे वाटते की, आम्ही जे काही सामने जिंकले, त्यापैकी जास्त सामन्यात आम्ही नेहमीच दडपणाखाली होतो. शेवटचा सामना हा एकमेव सामना होता, जिथे आम्ही सामन्यात पुढे होतो आणि आम्हाला माहित होते की, आमच्याकडे ज्या प्रकारचे फलंदाज आहेत, ते सामना संपवतील. पण तसे झाले नाही. याबाबत ग्रुपमध्ये चर्चा देखील सुरू होती.

हार्दिक पुढे म्हणाला, 'या सामन्यातही जेव्हा लखनौच्या आठ विकेट पडल्या, तेव्हा मी म्हणालो की पूर्णपणे वर्चस्व गाजवा. हा खेळ सुंदर आहे.' गुजरात टायटन्सचे 12 सामन्यांतून 18 गुण आहेत आणि टेबल टॉपर म्हणून लीग टप्पा पूर्ण करण्याची दाट शक्यता आहे. गुजरातचा पुढील दोन सामन्यांमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल.

हेही वाचा -IPL 2022 Updates : राशिद खानच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद; टी-20 क्रिकेटमध्ये 'अशी' कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.