Nagpur T-20 Match : रोहित शर्माची तुफान फटकेबाजी; अक्षर पटेलची भेदक गोलंदाजीने भारताचा ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय

author img

By

Published : Sep 24, 2022, 7:40 AM IST

Updated : Sep 24, 2022, 12:04 PM IST

Captain Rohit Sharma's thunderous batting led to India's victory

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतातीय रोहीत शर्माच्या तुफान फटकेबाजीच्या ( Explosive Innings Played by Rohit Sharma ) जोरावर संघाने दणक्यात विजय ( Captain Rohit Sharma Storming Batting ) मिळवला. ( India has Achieved Victory Due to quality Performance ) पावसामुळे सामना तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाल्याने, मॅच प्रत्येकी आठ ओव्हरची खेळवण्यात आली. भारतीय संघाने 91 धावांचे लक्ष प्राप्त करून मालिकेत एक-एक ची बरोबरी साधली आहे.

नागपूर : दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात कर्णधार रोहित शर्माने केलेल्या धमाकेदार खेळीमुळे ( Captain Rohit Sharma Storming Batting ) भारताचा दणक्यात विजय झाला, अशी भावना नागपूरच्या क्रिकेट फॅन्सने व्यक्त केली आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये दर्जेदार कामगिरी केल्यामुळे भारताने हा विजय मिळवला आहे. ( India has Achieved Victory Due to quality Performance ) अक्षर पटेलची गोलंदाजी आणि रोहीत शर्माची तुफान फटकेबाजी आणि दिनेश कार्तिकची विजयी चौकाराने भारताला सिरीजमध्ये बरोबरी साधता ( Dinesh Karthik Winning Finisher ) आली. नागपूरच्या क्रिकेट फॅन्ससोबत ( cricket fans of Nagpur ) आमच्या प्रतिनिधीने खास बातचीत ( Cricket Fans of Nagpur Expressed Their Feeling ) केली.

भारताचा ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा दणक्यात विजय : दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतातीय संघाने जोरदार विजय मिळवला. पावसामुळे मैदान ओले असल्याने सामना तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे मॅच प्रत्येकी आठ ओव्हरची खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा संघाने 5 गडी गमावून 90 धावा काढल्या. भारतीय संघाने चार बॉल शिल्लक असतानाच 91 धावांचे लक्ष प्राप्त करून मालिकेत एक-एक ची बरोबरी साधली आहे.

India win over Australia
भारताचा ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव : तब्बल अडीच तास उशिराने टी-20 मॅच सुरू झाली. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजीसाठी एरोन पिंच आणि कॅमरिन ग्रीनची जोडी सलामी आली. पहिल्या ओवरमध्ये आक्रमक दिसत असलेल्या कॅमरिन ग्रीन रन आउट झाला. ग्रीन केवळ पाच धावा काढू शकला. त्यानंतर ग्रेन मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला. मात्र, तो खाते उघडण्यापूर्वीच फिरकीच्या जाळ्यात अडकून क्लीन बोल्ड झाला. अक्षर पटेलने त्याच्या पहिल्याच ओवरमध्ये दोन विकेट घेतल्याने भारताची सुरुवात दमदार झाली.

India win over Australia
भारताचा ऑस्ट्रेलियावर दणक्यात विजय

अक्षर पटेलची भेदक गोलदांजी : अक्षर पटेलने आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना सामन्याच्या सुरुवातीलाच तंबूत परतवले. अक्षरच्या दुसऱ्या ओवरच्या पहिल्या बॉलमध्ये टीम डेव्हिडचा त्रिफळा उडवला. एकीकडे विकेट पडत असताना एरोन पिंच दुसऱ्या बाजूने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. एरोन पिंच ३१ धावा काढून तंबूत परतला.

ऑस्ट्रेलियाकडून मॅच्यू वेड आणि स्मिथची तुफान फटकेबाजी : सामन्यावर भारतीय गोलंदाजांची पकड मजबूत होत असताना मॅच्यू वेड आणि स्मिथच्या जोडीने भारतीय गोलंदाजाची धुलाई सुरू केली. मॅच्यू वेडने 43 धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 90 पर्यंत पोहचवली. अक्षर पटेलने दोन ओवरमध्ये १३ धावा देत दोन विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराहने एक विकेट मिळवली.

भारताचा डाव : भारतीय संघाला 48 बॉलमध्ये 91 धावांचा डोंगर सर करायचा होता. लक्ष्य मोठे असल्याने पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून के. एल. राहुल आणि रोहित शर्मा सलामीला आले. पहिल्या ओव्हरमध्येच भारताने आपले इरादे स्पष्ट केले होते. सलामीवीर रोहित शर्माने दोन षटकार खेचले, तर त्यानंतर राहुलनेसुद्धा षटकार मारत संघाची धावसंख्या २० वर पोचवली.

रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत केला नवा विश्वविक्रम : त्यानंतर दोघांनी तुफान फटकेबाजी सुरूच ठेवली होती. मात्र, तिसऱ्या ओव्हरमध्ये के. एल. राहुल दहाच्या धावसंख्येवर बोल्ड झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. त्याने सहा बॉलमध्ये ११ धावांची खेळी केली. एका बाजूने रोहित शर्मा किल्ला लढवत असताना दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत होत्या. तरीही रोहित एकटाच शेवटपर्यंत मैदानात दटून उभा होता आणि भारताला एकहाती विजय मिळवून देण्यात सफल ठरला. या दमदार खेळीसहित रोहित शर्माने आपल्या नावे एक मोठा विश्वविक्रम केला आहे.

दिनेश कार्तिकने ठरला विजयी फिनिशर : ( Dinesh Karthik Winning Finisher ) रोहितच्या मदतीला आलेला सुर्यकुमार यादव पहिल्याच बॉलमध्ये पायचित झाला. त्यामुळे भारताची धावसंख्या 55 वर 3 विकेट्स अशी झाली होती. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यांने 9 धावांचे योगदान दिले. त्यानंतर मात्र दिनेश कार्तिकने दोन बॉलमध्ये दहा धावा काढून भारताचा विजय सुकर केला.

Last Updated :Sep 24, 2022, 12:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.