''मला कोणच्या न्यायालयाने दोषी ठरवले? बनावट मीडियाला लाज वाटली पाहिजे", ललीत मोदीचा पलटवार

author img

By

Published : Jul 18, 2022, 4:51 PM IST

ललित मोदी

सुष्मिता सेनसोबत डेट केल्याच्या बातमीवर ललित मोदी याने आपले मौन सोडले आहे. मीडियावर चालवण्यात आलेल्या त्याच्या विषयीच्या बातम्यांवर तो भडकला आहे. आयपील यशस्वी होण्यात त्याचे किती मोठे योगदान आहे याचा पाढाच त्याने वाचून दाखवलाय. त्याच्या विषयी चालवण्यात आलेल्या खोट्या बातम्यांचाही त्याने खरपूस समाचार घेतला आहे.

मुंबई - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे संस्थापक आणि उद्योगपती ललित कुमार मोदी यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की तो बॉलीवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनला डेट करत आहे. तेव्हापासून बी-टाऊन आणि देशात खळबळ उडाली आहे. या ट्विटसोबत ललित मोदींनी पुरावा म्हणून अभिनेत्रीसोबतचे काही रोमँटिक फोटोही शेअर केले होते. ललितच्या या ट्विटनंतर ही बातमी संपूर्ण देशात आगीसारखी पसरली. ललित आणि सुष्मिताबद्दल सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला होता आणि अनेक युजर्सने सुष्मिताला गोल्ड डिगर असेही म्हटले होते. मात्र, सुष्मिता सेनने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर ललित मोदींनी मौन सोडले असून एक लांबलचक नोट लिहून ट्रोल करणाऱ्यांवर आपला राग काढला आहे.

ललित मोदींनी इंस्टाग्रामवर काही फोटोंसह एका पोस्टला कॅप्शन दिले आहे, ''मीडिया मला ट्रोल करण्यासाठी इतका वेडा का झाला आहे, मला चार चुकीच्या पद्धतीने टॅग केले जात आहे, मला वाटते की आपण अजूनही मध्यम वयात जगत आहोत, दोन लोक मित्र असू शकत नाहीत आणि जर केमेस्ट्री आणि वेळ योग्य असेल तर चमत्कारही होऊ शकतो. माझा सल्ला आहे, जगा आणि दुसऱ्यांनाही जगू द्या, योग्य बातम्या लिहा. Fakenews' सारखी नाही."

पुढे खुलासा करताना ललित मोदींनी लिहिले की, ''पत्नी मीनल मोदी ही माझ्या आईची मैत्रीण नव्हती, तर माझी मैत्रीण होती.'' याबद्दलचा खुलासा करताना मोदीनी लिहिले, 'मीनल माझ्या आईची नव्हे तर 12 वर्षांपासून माझी मैत्रीण होती. जेव्हा कोणी आपल्या देशाचे कल्याण करतो किंवा त्याच्या देशाचे भले करतो तेव्हा आनंद व्यकत करा, मी तुम्हा सर्वांपेक्षा माझे डोके वर ठेवतो, तथापि, तुम्ही मला 'भगोडा' म्हणता... मला सांगा की कोणत्या न्यायालयाने मला कधी दोषी ठरवले, मी तुम्हाला सांगतो, कोणीही नाही. .. लाज वाटावी बनावट मीडियाला'.

तो पुढे म्हणाला की, ''मी देशासाठी जे केले ते कौतुकास्पद आहे, मी 29 नोव्हेंबर 2005 रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी बीसीसीआयमध्ये रुजू झालो होतो, त्यावेळी बीसीसीआयच्या बँक खात्यात 40 कोटी होते, माझ्यावर बंदी घालण्यात आली तेव्हा त्याच खात्यात त्यावेळी 47 हजार 680 कोटी रुपये होते. कोणी कधी मदत केली आहे का? नाही. कुठून सुरुवात करावी तेही कळत नव्हते. खोट्या मीडियाची लाज वाटते. आता तुम्ही त्याला हिरोसारखे पहा, थोडे प्रामाणिकपणा दाखवा. भारतातील 12-15 शहरांमध्ये व्यवसाय करणे किती कठीण आहे हे सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना माहित आहे की हे सर्व मी एकट्याने केले आहे. BCCI मध्ये कोणी काही केले नाही, ते सगळे तर 500 डॉलर्स आणि TA, DA मिळवण्यासाठी आले होते, तुम्हाला आणखी कोण माहित आहे, ज्याने माझ्यासारखे आयपीएल बनवले आणि त्याची मजा लुटण्यासाठी देशाची एकजूट होण्यासाठी मदत केली.''

हेही वाचा - रणबीरने आपल्याला 'जुळे' होणार म्हटल्यानंतर इंटरनेटवर वादळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.