'आम्ही जे भोगलो त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही': आर्यन खानच्या अटकेबाबत गौरी खानने सोडले मौन

author img

By

Published : Sep 22, 2022, 9:39 AM IST

आर्यन खानच्या अटकेबाबत गौरी खानने सोडले मौन

कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आर्यन खानच्या अटकेबाबत गौरी खानने मौन सोडले आहे. आर्यनच्या अटकेच्या काळात कुटुंबाने जे त्रास भोगले त्याहून अधिक वाईट काही असू शकत नाही, असे ती म्हणाली.

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने ( Shah Rukh Khan's wife Gauri Khan ) कॉफी विथ करण 7 च्या ( Koffee with Karan 7 ) लेटेस्ट एपिसोडमध्ये आर्यन खानच्या अटकेबाबत ( Aryan Khan's arrest ) मौन सोडले आहे.

करण जोहरच्या चॅट शोच्या ताज्या एपिसोडमध्ये, नेटफ्लिक्सच्या वेब शो 'फेब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज' ( Fabulous Lives of Bollywood Wives ) ची स्टार कास्ट, गौरी खान, महीप कपूर आणि भावना पांडे यांनी हजेरी लावली होती.

त्यांच्या गमतीशीर संवादादरम्यान, करण जोहरने गौरीला विचारले, "त्याच्यासाठी (शाहरुख खान) केवळ व्यावसायिकच नाही तर कुटुंबाने वैयक्तिकरित्या जे काही केले आहे ते सर्व काही कठीण आहे आणि तुम्ही सर्वजण कुटुंब म्हणून ठाम राहिलात. मी तुला आई म्हणून ओळखतो आणि त्याला एक वडील म्हणून चांगले ओळखतो. आम्हीदेखील तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहोत आणि मला वाटते की मी तुमच्या मुलांचा गॉडपॅरेंट आहे. हे सोपे नव्हते आणि गौरी, तू नेहमीपेक्षा आणखी मजबूत झाली आहेस. जेव्हा कुटुंब अशा कठीण काळातून जात असते तेव्हा अशी परिस्थिती तू स्वतः हाताळलीस त्याबद्दल काय सांगशील?"

ज्यावर तिने उत्तर दिले, "एक कुटुंब म्हणून, आम्ही जे अनुभवले आहे, एक आई म्हणून, एक पालक म्हणून आम्ही जे अनुभवले त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. पण आज, जिथे आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून उभे आहोत, मी म्हणू शकते की आम्ही एका मोठ्या जागेत आहोत जिथे आम्हाला प्रत्येकजण प्रिय वाटतो. आमचे सर्व मित्र, आणि बरेच लोक ज्यांना आम्ही ओळखत नाही, अशांकडून आम्हाला इतके संदेश आणि खूप प्रेम मिळाले. आम्ही धन्य आहोत. ज्यांनी आम्हाला मदत केली त्या प्रत्येकाची मी आभारी आहे."

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबईत टाकलेल्या छाप्यांनंतर आर्यनला गेल्या वर्षी २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अटक केल्यानंतर 25 दिवसांनी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

गौरीने 17 वर्षांनंतर करण जोहरच्या चॅट शोमध्ये पुनरागमन केले. यात थेट प्रेक्षकांच्या 48% मतांसह गौरीने रॅपिड-फायर राउंड जिंकून आनंददायी भागाचा शेवट झाला.

करण जोहर निर्मित, 'द फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'चा दुसरा सीझन सध्या नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा - पाहा व्हिडिओ : राजू श्रीवास्तवचा गजोधर भैय्या कसा बनला? ऐका त्याच्याच तोंडून...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.