महाराष्ट्रात येत्या 48 तासात दमदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

author img

By

Published : Aug 12, 2019, 7:03 PM IST

Updated : Aug 12, 2019, 7:37 PM IST

येत्या 48 तासात महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागांना अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

पुणे - येत्या 48 तासात महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागांना अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 48 तासात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली तसेच वर्धा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली भागातील घाट माथ्यावर येत्या 48 तासात जोरदार पाऊस होईल. तसेच नाशिकमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. मराठवाड्यातही पावसाची शक्यता असून, हिंगोली व नांदेडमध्ये 13 ऑगस्टला काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

कोकण, गोवा भागांना पुढचे पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पालघर ठाणे मुंबई या भागात 14 ऑगस्टला दमदार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

Intro:महाराष्ट्रात येत्या 48 तासात जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी चा इशाराBody:mh_pun_03_rain_warning_state_av_7201348

anchor
येत्या 48 तासात महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे तर महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 48 तासात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात चंद्रपूर गडचिरोली वर्धा या भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली भागातल्या घाट माथ्यावर येत्या 48 तासात जोरदार पाऊस होईल ह्यातल्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर नाशिक मध्ये जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असून हिंगोली नांदेड मध्ये 13 ऑगस्टला एक-दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे कोकण गोवा परिसरामध्ये पुढचे पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता असून पालघर ठाणे मुंबई या परिसरात 14 ऑगस्टला जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या परिसरात 13 आणि 14 ऑगस्टला जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी चा इशारा हवामान विभागाने दिला आहे....Conclusion:
Last Updated :Aug 12, 2019, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.