Uddhav Thackeray on Party foundation day : 'आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको...'; मुख्यमंत्री ठाकरेंचा दगाबाजांना इशारा

author img

By

Published : Jun 19, 2022, 1:46 PM IST

Updated : Jun 19, 2022, 2:48 PM IST

Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray on Agnipath ) अग्नीपथ योजनेवर टीका केली आहे. उगाच स्वप्ने दाखवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे आहे. भाडोत्री सैनिक आणले जात आहेत, तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ( Uddhav Thackeray slammed Modi gov ) केंद्र सरकारला लगावला.

मुंबई - शिवसेना आज ( 19 जून ) आपला 56 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. माझा पक्ष हा पितृपक्षच आहे, कारण माझ्या पित्याने पक्ष स्थापन केला आहे. शिवसेना स्थापनेचा क्षण मनात आठवून गेला. शिवसेना कणखरपणे उत्तर देत आली आहे आणि देत राहू. 56 वर्षात शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं ( Uddhav Thackeray On Shivsena Vardhapan Din 2022 ) आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या स्थापनेवेळी जो नारळ फोडला गेला, त्याचे शिंतोडे माझ्यावर उडाले. ही जबाबदारी किती मोठी असू शकते हे मला तेव्हा माहित नव्हतं. आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको, असा इशारा दगाबाजांना उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

भाडोत्री सैनिक तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा- उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray on Agnipath ) अग्नीपथ योजनेवर टीका केली आहे. उगाच स्वप्ने दाखवून त्यांच्या भवितव्याशी खेळणे आहे. भाडोत्री सैनिक आणले जात आहेत, तसे भाडोत्री पंतप्रधान, मुख्यमंत्री आणा, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ( Uddhav Thackeray slammed Modi gov ) केंद्र सरकारला लगावला. धाडसाला मरण नसते. हा शिवसेनेचा स्थायीभाव आहे. आणीबाणीत शिवसेनेवर बंदीच आली असे वातावरण होते. त्यावेळी विरोधी पक्ष हतबल होता. आता शिवसेना मजबूत झाली आहे. ज्यावेळी हिंदुत्वाचा उच्चार करायाला कोणीच तयार नव्हते, तेव्हा शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा बुलंद केला.

विधानपरिषद निवडणुकीची मला चिंता नाही. निवडणुकीत शिवसेना विजयी होणारच- उद्धव ठाकरेमुंबई- शिवसेनेत गद्दार कोणीही राहिलेले नाही. फाटाफुटीचे राजकारण झाले तरी शिवसेना मजबूत झालेली आहे. हे इतिहासात आपण दाखवून दिले आहे. मोदी सरकारच्या विरोधात असंतोष, उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र शांतमुंबई - जोपर्यंत सूत्रे आमच्याकडे म्हणजे शिवसेनेकडे महाराष्ट्र शांत आहे. मोदी सरकारच्या विरोधात असंतोष असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेने नवीन चेहर्‍यांना संधी दिली- महाराष्ट्राकडे सत्तेचा माज चालत नाही. शेराला सव्वाशेर हा येतच असतो. महाराष्ट्र जेव्हा पेटतो, तेव्हा जाळून खाक केल्याशिवाय राहत नाही. सचिन अहिर, आमशा पाडवी यांना आंधळेपणाने उमेदवारी दिलेली नाही. शिवसेनेने नवीन चेहर्‍यांना संधी दिली. दिवसागणिक यशाची कमाल वाढती राहो, या वर्धापनदिनी शुभेच्छा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा-Vidhan Parishad Election 2022 : फडणवीसांना शह देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची व्यूहरचना; ऐनवेळी ठरवणार कोटा

Last Updated :Jun 19, 2022, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.