Maharashtra Political Crisis : बहुमत चाचणीबाबत राज्यपालांनी सचिवांना पाठवलेले 'ते' पत्र फेक

author img

By

Published : Jun 29, 2022, 9:53 AM IST

Updated : Jun 29, 2022, 5:49 PM IST

Governor Bhagat Singh Koshyari

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांची राजभवन येथे भेट घेतली. यादरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा विधान भवन सचिवांना ३० जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र लिहिले आहे.

मुंबई - शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या बंडमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलत असताना एक नवीन बातमी समोर आली आहे. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांची राजभवन येथे भेट घेतली. यादरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी सुद्धा विधान भवन सचिवांना ३० जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी पत्र लिहिले आहे. तसे पत्र व बातम्या सर्व ठिकाणी पसरू लागल्या आहेत. परंतु हे पत्र फेक असल्याचे राजभवन कडून सांगण्यात आले आहे.

काय आहे पत्रात? -

सचिव, महाराष्ट्र विधानसभा.29 जून 2022विधान भवन,

विषय : महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावणे

मला महाराष्ट्र विधानसभेतील काही अपक्ष आमदारांच्या वतीने तसेच विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षाच्या वतीने दिनांक 28.06.2022 रोजी पत्र मिळाले आहे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उद्धव ठाकरेंनी विधानसभेतील बहुमताचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे विधानसभेच्या पटलावर ताबडतोब फ्लोअर टेस्ट घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती त्यांनी मला केली आहे.मी 28.06.2022 रोजीच्या वरील पत्रांचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बारकाईने निरीक्षण करत आहे. सर्व संबंधित साहित्य विचारात घेऊन माझे असे मत आहे की उद्धव ठाकरेंनी सभागृहात बहुमताचा विश्वास गमावला आहे. परिणामी, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७४ r/w 175(2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, दिनांक 29.06.2022 च्या पत्राने 30.06.2022 रोजी सकाळी 11:00 महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे निर्देश दिले. आणि कलम 174 r/w 175(2) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराच्या वापरात भारतीय संविधान मी खालील निर्देश जारी करत आहे.

  • महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन 30.06.2022 रोजी सकाळी 11:00 वाजता सरकारच्या विरोधात विश्वासदर्शक ठरावाचा एकमेव अजेंडा घेऊन बोलावण्यात येईल.
  • विधानसभेचा कारभार अशा रीतीने चालवला जाईल की भाषणे, जर काही असतील, तर ती अल्पावधीत संपतील आणि विश्वासदर्शक ठराव ३०.०६.२०२२ रोजी संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत पूर्ण होईल.
  • महाराष्ट्र विधानसभा नियमांच्या नियम 41 नुसार विचार केल्याप्रमाणे मत मोजण्याच्या उद्देशाने सदस्यांना त्यांच्या जागेवर उठण्यास सांगून मतदान केले जाईल.
  • विश्वासदर्शक ठरावाची संपूर्ण कार्यवाही विधानसभा सचिवालयाने स्वतंत्र एजन्सीमार्फत व्हिडिओग्राफ केली जाईल.
  • उपरोक्त कार्यवाही 30.06.2022 रोजी सकाळी 11:00 वाजता सुरू केली जाईल आणि कोणत्याही प्रकरणाला स्थगिती, विलंब किंवा स्थगिती दिली जाणार नाही.
  • सदस्‍यांच्या सुरक्षेसाठी विधानभवनाच्‍या बाहेर आणि आतील भागात पुरेशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.

पत्रावर तारीख 29 जून - राज्यपाल महोदयांकडून हे पत्र विधानभवन सचिवांना लिहिले असले तरी या पत्रावर 29 जून या तारखेचा उल्लेख असल्याकारणाने याबाबत अजूनही संभ्रम निर्माण झाला आहे. तरीसुद्धा सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता हे पत्र राज्यपालांनी तयार केले असून, ते आज ( 29 जून ) विधानभवन सचिवांकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated :Jun 29, 2022, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.