राज्यात दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार? - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

author img

By

Published : Sep 24, 2021, 12:50 PM IST

उपमुख्यमंत्री अजित पवार

लहान मुलांच्या लसी अजून आलेल्या नाहीत. लसी आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमचा आमचा विचार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

मुंबई : देशभरातील अनेक राज्यांनी शाळा सुरु केल्या आहेत. पण अद्याप महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झालेल्या नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप असल्याने अद्याप सर्व शाळा सुरु करण्यात आलेल्या नव्हत्या. पण गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने आता सरकार सर्व शाळा सुरु करण्याच्या दिशेने विचार करत असल्याचे दिसून येते. यासंदर्भात बोलाताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की राज्यात लवकरच शाळा, महाविद्यालय सुरु करण्याबाबत भूमिका घेण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात काय परिस्थिती आहे, ते पाहून पुढचे पाऊल, उचलण्यात येईल.

दिवाळीनंतर शाळेची घंटा वाजणार?

कोरोनामुळे सुमारे दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. ऑनलाइन वर्गाच्या माध्यमातून ज्ञानार्जन करण्यात येत आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच आढावा घेऊन अंतिम निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. कोरोनाची सद्यस्थिती परिस्थिती काय आहे, तिसऱ्या लाटेचे काही संकेत आहेत का, 2 ऑक्टोबरपर्यंत काय परिस्थिती असेल ते बघायचे आहे. त्यानंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेता येऊ शकतो का, यावर चर्चा होईल, विचार होईल. तसेच टास्क फोर्सच्या सदस्यांची मते विचारात घेतली जातील, असे पवार म्हणाले.

मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील -

लहान मुलांच्या लसी अजून आलेल्या नाहीत. लसी आल्या की मुलांचे लसीकरण करायचे, त्यानंतर दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याची आमचा आमचा विचार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये सुरू करू - आदित्य ठाकरे

बोरिवलीतील मुंबई पब्लिक स्कूल मधील CBSE बोर्ड लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील शाळा सुरू करण्यासंदर्भात वक्तव्य केले. कोविड गेल्यावर लवकरात लवकर मुंबईतील सर्व शाळा सुरू होणार आहेत, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच ज्यांचे दोन डोस झाले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करू, असेही त्यांनी सांगितले. तर राज्यपालांच्या संदर्भात मी जास्त काही बोलणार नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.