'आयुष्याची पहिली लढाई आईच्या पोटातच जिंकली, स्पर्धा परीक्षा चिल्लर'

author img

By

Published : Jul 21, 2021, 5:11 PM IST

Updated : Jul 21, 2021, 5:39 PM IST

nitesh karale

राज्यात एमपीएससीची तयारी करणारे जवळपास सात ते आठ लाख विद्यार्थी आहेत. मात्र पाचशे ते सहाशेच्यावर पदांची भरती होत नाही. मग इतक्या मोठ्या स्पर्धेत टिकणं खूप कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने 'प्लान बी' तयार करून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्यासाठी पुढील मार्ग मोकळा राहील, असे मतं नितेश कराळे यांनी मांडले.

मुंबई - आईच्या बिजांडावर 14 कोटी शुक्राणुंचा प्रवेश होतो. त्यातील एका शुक्राणुमुळे तुमचा जन्म होतो. म्हणजे 13 कोटी 99 हजार 999 शुक्राणुंवर मात करून तुम्ही जन्म घेता. त्यामुळे तुम्ही आयुष्याची पहिली शर्यंत आईच्या पोटातच जिंकली असल्याने स्पर्धा परीक्षेची शर्यंत चिल्लर असल्याचे परखड मत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि फिनिक्स करिअर डेव्ल्पमेंट अकॅडमीचे संचालक नितेश कराळे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखत व्यक्त केले. जीवनात अनेक संकट येत असतात, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसल्याचंही ते म्हणाले.

'आयुष्याची पहिली लढाई आईच्या पोटातच जिंकली, स्पर्धा परीक्षा चिल्लर'

'प्लान बी' तयार ठेवा -

राज्यात एमपीएससीची तयारी करणारे जवळपास सात ते आठ लाख विद्यार्थी आहेत. मात्र पाचशे ते सहाशेच्यावर पदांची भरती होत नाही. मग इतक्या मोठ्या स्पर्धेत टिकणं खूप कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाने 'प्लान बी' तयार करून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्यासाठी पुढील मार्ग मोकळा राहील, असे मतं नितेश कराळे यांनी मांडले.

संपूर्ण मुलाखतीसाठी - व्हिडिओ पाहा बे पोट्टेहो! : स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, राजकारण आणि सरांची गर्लफ्रेन्ड...

'मी फेलीवर माणूस' -

कराळे सरांनी स्वत:चं उदाहरण देत म्हणाले, की मी फेलीवर व्यक्ती आहे. बीएससी ला सतत चारवेळा नापास झालो. पीएसआय ची परीक्षा देखील लागोपाठ चारवेळा नापास झालो. तसेच महाराष्ट्र वनविभागाच्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत जाऊन परत आलो. एसटीआयची मुख्य परीक्षा दोनदा दिली आहे. मी सतत आठ परीक्षा नापास झालो. परंतु हिंमत हरलो नाही, नवीन मार्ग शोधत गेलो. जे आपल्या मनाला चांगलं वाटते ते करत जावं. स्पर्धा परीक्षेत हरलो म्हणून काळजी करू नका, मस्तमौला जीवन जगा, असा सल्ला त्यांनी दिला.

काम करायची लाज बाळगू नये -

पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र मुलं जास्त शिकली की त्यांना काम करायची लाज वाटते. कोरोना काळात मी शेतातील कांद्यांची विक्री केली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नैराश्यात न जाता अनेक मार्गांचा विचार करावा आणि कामात कोणतीही लाज बाळगू नये, असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.

Last Updated :Jul 21, 2021, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.