Maharashtra Monsoon Update : राज्यात पुन्हा एकदा 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढणार; विदर्भात जास्त पावसाची शक्यता

author img

By

Published : Jul 18, 2022, 11:15 AM IST

Updated : Jul 18, 2022, 1:33 PM IST

Maharashtra Monsoon Update

गेल्या काही ( Monsoon Update ) दिवसांपासून राज्यात ( Maharashtra Rain Update ) मुसळधार पाऊस ( Once Again a Warning of Heavy Rain ) चालूच आहे. तरी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर ( scientist K. A. Hosalikar ) यांनी पुन्हा 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढू शकतो, असे सांगितले आहे. तरी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसा आणखी पाऊस वाढणार असल्याने पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ( Some Districts have been Alerted )

मुंबई : राज्यामध्ये ( Maharashtra Rain Update ) पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा ( Once Again a Warning of Heavy Rain ) देण्यात आला आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पुढील 4 ते 5 दिवस आणखी पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. ए. होसाळीकर यांनी पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर वाढणार ( ( More Rain in Next 4 to 5 Days ) आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ( Some Districts have been Alerted )

विदर्भात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे : हवामान खात्याने आता विदर्भात पुढील चोवीस तासांत अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जूनमध्ये फार कमी पाऊस पडला होता. परंतु, जुलैला सुरुवात झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. परंतु, आता गेली 8 ते 10 दिवसांपासून पाऊस जोरात आहेच. परंतु, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात ( Heavy Rain in Vidarbha ) आल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यातसुद्धा जास्त पावसाची शक्यता : मुंबई हवामान विभागाकडून पुढील 4 ते 5 दिवस पाऊस होणार असल्याचे सांगितल्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी वाढणार पावसाचा जोर : मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या भागात पावसाचा जोर सुरूच असताना. पुन्हा एकदा हवामान खात्याने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाची सुरूच आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी मागील काही दिवसांत अतिवृष्टीदेखील झाली.

मुसळधार पावसाने लोकांची हानी : राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्याच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण झालीय. आतापर्यंत या पावसात ९९ जणांचा बळी गेलाय. तर १८१ जनावरं दगावलीत. तर आजवर ८ हजार नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलंय. आज पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पूरस्थिती कायम आहे. रायगड, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरीमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय. तिकडे गुजरातमध्येही पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरलाय. परिणामी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील पाणी कमी झालंय.

मुंबईसह उपनगरात पडतोय जोरात पाऊस : गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला ( Mumbai rains update news ) होता. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र, पुढील दोन दिवस पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा : Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान; महाराष्ट्रातून होणार भरघोस मतदान

Last Updated :Jul 18, 2022, 1:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.