Bala Nandgaonkar : राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गृहमंत्र्यांच्या भेटीला? धरपकड थांबणार?

author img

By

Published : May 11, 2022, 12:48 PM IST

Bala Nandgaonkar Dilip Walse Patil

भोंगा आणि हनुमान चालीसा वादानंतर ( Azan Vs Hanuman Chalisa ) आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Bala Nandgaonkar Met Dilip Walse Patil ) यांची भेट घेतली. राज्यात मनसे कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईच्या ( Action Against MNS Workers ) पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांचा निरोप घेऊन जात नांदगावकर यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

मुंबई : 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतलेल्या पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. याच वेळी त्यांनी मशीनवरील अनधिकृत भोंग्यांवर निशाणा ( Azan Vs Hanuman Chalisa ) साधला. या भोंगा प्रकरणामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. या कारवाईमुळे मनसेचे दोन प्रमुख फायरब्रँड नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी अद्याप नॉट रिचेबल आहेत. त्यातच आता बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट ( Bala Nandgaonkar Met Dilip Walse Patil ) घेतल्याने कार्यकर्त्यांची धरपकड थांबेल ( Action Against MNS Workers ) का ? हे पाहणं महत्वाचं आहे.


गृहमंत्र्यांची भेट अद्याप तपशील नाही : बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट कार्यकर्त्यांवरील कारवाई संदर्भात घेतल्याचे प्राथमिक माहिती आहे. या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व नांदगावकर यांच्यात तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं ? याचा तपशील अद्याप मिळालेला नाही. मात्र, या भेटीमुळे कार्यकर्त्यांची धरपकड कमी होईल असं बोललं जात आहे.


नांदगावकर थेट शिवतीर्थावर : गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या भेटीनंतर नांदगावकर राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. या बैठकीतील सर्व तपशील ते राज ठाकरे यांना देणार असून, या भेटीनंतर मनसेचे पुढची भूमिका काय असेल यावर चर्चा केली जाईल. राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतरच बाळा नांदगावकर माध्यमांशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.


राज ठाकरे यांनी लिहिल मुख्यमंत्र्यांना पत्र : दरम्यान, मंगळवारी (10 मे) राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, "आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. सत्ता येते आणि जाते. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही उद्धव ठाकरे तुम्हीसुद्धा. महाराष्ट्र सरकारने मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही."

हेही वाचा : Thackeray Vs Thackeray : 'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका'; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.