Radhanagari Dam : राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पहाटे पहिला स्वयंचलित दरवाजे उघडला

author img

By

Published : Aug 10, 2022, 8:48 AM IST

Radhanagari Dam

Radhanagari Dam : दोन दिवसातच पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीपासून केवळ अर्धा फूट दूर आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर राधानगरी धरण सुद्धा 98 टक्के इतके भरले आहे.

कोल्हापूर - कोल्हापुरात पावसाचा जोर कायम आहे. धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी दोन दिवसातच पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीपासून केवळ अर्धा फूट दूर आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर राधानगरी धरण सुद्धा 98 टक्के इतके भरले आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुद्धा रात्रीपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील 75 पेक्षाही अधिक बंधारे पाण्याखाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुन्हा एकदा महापुराची भीती व्यक्त केली जात आहे.

Radhanagari Dam

मुसळधार पाऊस सुरू - कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील राधानगरी पाणलोट क्षेत्रासह, आजारा, गगनबावडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण 100% भरला असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज पहाटे 5 च्या सुमारास गेट क्रमांक 6 उघडला असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत ही झपाट्याने वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडे होऊ लागली आहे. यामुळे प्रशासन ही अलर्ट झाले असून खबरदारी म्हणून नदीकाटच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पहाटे धरणाचे 6 क्रमांकाचा दरवाजा उघडला - राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरण सध्या 100 टक्के भरला असल्याने धरणाला असलेले स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत आज पहाटे 5 च्या सुमारास दरवाजा क्रमांक 6 उघडला असून यामधून 1428 क्युसेक्स तर पॉवर हाऊस मधून 1600 असे एकूण 3028 क्युसेक्सचा पाण्याचा विसर्ग सध्या नदीत सुरू आहे. धरण 100% भरल्यास धरणाचे दरवाजे आपोआप उघडतात. काल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पाऊसाची नोंद करण्यात आली असून अतिवृष्टी झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज पहाटे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये मोठया प्रमाणात वाढ होऊ लागली. नदीकाठावरील नागरिकाना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे - कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी काल रात्री 10 च्या सुमारास आपली इशारा पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी 6 वाजता 39 फूट 8 इंचावर गेली असून, पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत 71 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी गाठल्याने यंत्रणा ही सतर्क झाले असून दरम्यान राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रशासनाकडून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तर दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावांतील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा - Sanjay Rathod : संजय राठोड कोण आहेत? ते सध्या चर्चेत का आहेत?

हेही वाचा - Devendra Fadnavis on Cabinet Expansion : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे- फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.