शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स सुरुवातीला 260 अंकांनी वधारला

author img

By

Published : Sep 6, 2021, 11:20 AM IST

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स सुरुवातीला 260 अंकांनी वधारला

शेअर मार्केटने पुन्हा एकदा 58 हजारांचा पल्ला गाठला आहे. आज सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच 260 अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स 58,390.21 वर पोहचला आहे. तर निफ्टीत 75 अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी 17,399.35 अंकांवर पोहोचलाय.

मुंबई - भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एकदा 58 हजारांचा पल्ला गाठला आहे. आज सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच 260 अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स 58,390.21 वर पोहचला आहे. तर निफ्टीत 75 अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी 17,399.35 अंकांवर पोहोचलाय.

सुरुवातीला 30 शेअर असलेला सेन्सेक्स 260.26 अंकांनी किंवा 0.45 टक्क्यांनी 58,390.21 वर आणि निफ्टी 75.75 अंक किंवा 0.44 टक्क्यांनी 17,399.35 वर होता.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज अवघ्या दोन टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर होती. तसेच बजाज ऑटो, एल अँड टी, एचयूएल, एम अँड एम, डॉ रेड्डीज आणि बजाज फिनसर्वचे शेअर्सही वाढले. दुसरीकडे, एशियन पेंट्स, टीसीएस, पॉवर ग्रिड, टायटन आणि टेक महिंद्राचे नुकसान झाले.

मागील सत्रात 30 शेअर्सचा सेन्सेक्स 277.41 अंक किंवा 0.48 टक्क्यांनी वाढून 58,129.95 वर बंद झाला होता. तर निफ्टी 89.45 अंक किंवा 0.52 टक्क्यांनी वाढून 17,323.60 वर पोहचला होता. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 1.20 टक्क्यांनी घसरून 71.74 डॉलर प्रति बॅरलवर आले.

सध्या बाजारात कोणतीही नकारात्मक बातमी नाही. ज्याचा बाजारावर काही वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळातही वेग कायम राहणे अपेक्षित आहे. यासोबतच बाजारात मान्सूनचा लाभही मिळत आहे. तथापि, तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की अफगाणिस्तान, इराणसह अनेक देशांमध्ये राजकीय आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आगामी काळाता याचा काही परिणाम शेअर मार्केटवर पडू शकतो.

शेअर बाजार म्हणजे काय?

शेअर बाजार म्हणजे अनिश्चितता होय. इथं एक दिवसात लाखो रुपये कमावणारा व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा खाली येतो. त्यामुळे शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करताना फार विचारपूर्वक करावी लागते. जर नुकसान झाले तर त्यांची जोखीम सहन करण्याची तयारी असावी लागते. एकेकाळी शेअर बाजार हा फक्त श्रीमंत उच्च वर्गाने विचार करण्याचा विषय आहे, असं मानलं जाई. कालांतराने हे चित्र बदलत गेलं आणि आता बहुतांश सर्वच वर्गातील लोकांनी आपली पावलं या दिशेने वळवली.

हेही वाचा - जावेद अख्तरांनी तालिबानची संघाशी केलेली तुलना शिवसेनेला अमान्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.