Army Day Parade : लष्कराच्या संयमाची चाचणी घेण्याची चूक कोणीही करू नये - लष्करप्रमुखांचा इशारा

author img

By

Published : Jan 15, 2022, 1:07 PM IST

जनरल एम.एम नरवणे

लष्करप्रमुख जनरल एम.एम नरवणे यांनी शनिवारी सांगितले की, भारतीय लष्कराचा संदेश स्पष्ट आहे की ते देशाच्या सीमेवर एकतर्फी स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही.

नवी दिल्ली - भारतीय लष्कर देशाच्या सीमेवर एकतर्फी स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असे लष्कर प्रमुख जनरल एम.एम नरवणे यांनी शनिवारी सांगितले. 'आर्मी डे परेड'मध्ये संबोधित ( Army Day Parade Delhi ) करताना ते म्हणाले की, मागील वर्ष लष्करासाठी अत्यंत आव्हानात्मक होते. तसेच चीनच्या उत्तरेकडील सीमेवरील घडामोडींचा उल्लेख त्यांनी केला. फिल्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी 1949 मध्ये त्यांच्या ब्रिटीश पूर्ववर्तींच्या जागी भारतीय लष्कराचे ( Indian Army ) पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्यामुळे 15 जानेवारी आर्मी डे पाळला जातो.

जवानांचे मनोबल गगनाला भिडले -

पूर्व लडाख स्टँड ऑफचा संदर्भ देत जनरल नरवणे म्हणाले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. भारत आणि चीन यांच्यात नुकतीच 14 व्या फेरीतील लष्करी स्तरीय चर्चा झाली. तसेच विविध स्तरांवरील संयुक्त प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये मतभेद दूर झाले आहेत. जे स्वतःच एक रचनात्मक पाऊल आहे. जनरल नरवणे म्हणाले की, परस्पर आणि समान सुरक्षेच्या आधारावर सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. देशाच्या सुरक्षेसाठी बर्फाच्छादित पर्वतांवर तैनात असलेल्या जवानांचे मनोबल गगनाला भिडले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

संयमाची चाचणी घेऊ नये -

"आमचा संयम हे आमच्या आत्मविश्वासाचे लक्षण आहे, परंतु कोणीही त्याची चाचणी घेण्याची चूक करू नये," जनरल नरवणे म्हणाले. "आमचा संदेश स्पष्ट आहे, भारतीय सैन्य देशाच्या सीमेवर एकतर्फी स्थिती बदलण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही." पॅंगॉन्ग सरोवर परिसरात हिंसक चकमकी झाल्यानंतर 5 मे 2020 पासून भारत आणि चीनचे सैन्य पूर्व लडाखमध्ये लष्करी अडथळ्यात अडकले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांनी लष्करी पातळीवरील चर्चेच्या 14 फेऱ्या केल्या आहेत. 5 मे 2020 रोजी झालेल्या हिंसक चकमकीनंतर, भारतीय आणि चिनी सैन्याने हळूहळू हजारो सैनिक तसेच अवजड शस्त्रास्त्रे घेऊन त्यांची तैनाती वाढवली. लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या मालिकेचा परिणाम म्हणून, दोन्ही बाजूंनी गेल्या वर्षी पॅंगॉन्ग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर आणि गोगरा परिसरात विघटन प्रक्रिया पूर्ण केली.

भारतात दहशतवादी घुसवण्याचा घाट -

संवेदनशील क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) प्रत्येक बाजूला सध्या सुमारे 50,000 ते 60,000 सैनिक आहेत. जनरल नरवणे म्हणाले की, नियंत्रण रेषेवरील परिस्थिती मागील वर्षीपेक्षा चांगली आहे, परंतु पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. सीमेपलीकडील प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे 300-400 दहशतवादी भारतात घुसण्याची वाट पाहत आहेत, असे ते म्हणाले, गेल्या एका वर्षात एकूण 194 दहशतवादी काउंटर ऑपरेशनमध्ये मारले गेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.