2 thousand note ban : नागरिकांचे अर्थ गणित बिघडवणारी 2 हजारची गुलाबी नोट का झाली बंद, काय होता इतिहास

author img

By

Published : May 20, 2023, 9:08 AM IST

2 thousand note  ban

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा बाद केल्या आहेत. ज्या नागरिकांकडे या नोटा आहेत त्या बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. चलनात का आल्या होत्या 2 हजार रुपयांच्या नोटा, हे जाणून घेऊ.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून 2000 रुपयांच्या नोटा बाद केल्या आहेत. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. ज्यांच्याकडे या नोटा आहेत, ते नागरीक बँक खात्यात जमा करू शकतात किंवा त्या बदल करुन घेऊ शकणार आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा का बंद करण्यात आल्या. या नोटा बंद करायच्या होत्या मग या दोन हजार रुपायांच्या नोटा चलनात का आणल्या गेल्या. ही प्रश्न अनेकांना पडला आहे. याचबरोबर या नोटांचा रक्तरंजीत इतिहास आहे, तो काय आहे हे आपण जाणून घेऊ.

का बंद करण्यात आली 2 हजार रुपयांची नोट : बाजारातून या नोटा हळू-हळू कमी होऊ लागल्या होत्या. त्यामागे कारण म्हणजे या नोटा बंद होणार आहेत. देशात पुन्हा नोटाबंदी केली जाईल,अशा अफवा या दोन हजारांच्या नोटांविषयी उठवल्या जात होत्या. यामुळे या नोटा दुकानदार स्वीकारत नव्हते. ग्राहक सुद्धा या नोटा स्वीकरत नव्हते. ज्या लोकांकडे दोन हजारांची नोट असायची त्याला सुट्ट्या पैशांसाठी खूप समस्या निर्माण होत होती. कारण 500 नंतर थेट 2 हजार रुपयांची नोट असल्यामुळे सुट्टे लवकर मिळत नसतं.

नोटा बंद करण्याचे कारण काय ? : भारताच्या चलनात 31 मार्च 2017 पर्यंत या नोटांच्या एकूण मूल्यामध्ये 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता. तर 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2000 रुपयांच्या नोटांचा वाटा 13.8 टक्के होता. दरम्यान आरबीआयने 2000 रुपयांची नोट बंद केली नसली तरी ती छापली जात नाही.

छपाई झाली बंद : या नोटांची 2016-2017 या वर्षात मोठी छपाई झाली होती. 35429.91 कोटी इतक्या नोटांची छपाई करण्यात आली होती. तर 2017-18मध्ये 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यात 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. त्यानंतर 2019 ते 2022 या काळात एकही नोट छापण्यात आली नाही.

का आणण्यात आल्या होत्या या नोटा : भारत सरकारने 2016 मध्ये नोटाबंदी केली होती. या काळात 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने नवीन नोटा चलनात आणल्या होत्या. यात नव्या रुपात 500 रुपयांची नोट आली तर नवीन 2 हजार रुपयांची नोट सुरू करण्यात आली. याचा सर्वात मोठा उद्देश, होता देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर आणण्याचा. परंतु 2016 मध्ये नोटाबंदी करुन याचा काही फायदा झाला नाही.

नोटाबंदीच्या काळात अनेकांनी गमावला जीव : केंद्र सरकारने जेव्हा 500 आणि 1000 रुपयांची नोट बंद केली होती. त्यानंतर 2 हजार रुपयांची नोट बाजारात आणली होती. परंतु चलनात आलेल्या गुलाबी नोटांमुळे बँकांसमोर उभे- राहुन राहून अनेक लोकांचा जीव गेला होता. वर्ष 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटाबंदीच्या काळात नव्या आलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाईत खूप कमतरता होती. पैसे मिळवण्यासाठी नागरिाकांना बँकेसमोर तासन् तास उभे राहावे लागले होते. मग काही काळानंतर छापाईत वाढ झाली तेव्हा नागरिकांना या नोटांच्या सुट्ट्यांसाठी त्रास सहन करावा लागला.

अर्थव्यवस्थेवर झाला होता परिणाम : नोटबंदी हे देशातील आर्थिक मंदीचे प्रमुख कारण ठरले होते. एका अहवालानुसार, नोटाबंदीनंतर जीडीपीला फटका बसला होता. पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.1 टक्क्यांवर आला होता. या नोटाबंदीचा परिणाम लघु उद्योगांवरही झाला होता. रोखीने होणारे व्यवहार त्यामुळे बंद झाले होते. रोख रक्कम नसल्याने अनेकांचे उद्योग बंद झाले होते.

हेही वाचा -

  1. KCR On BRS Model In Country : विकासाचे बीआरएस मॉडेल भारतभर नेणार; बीआरएसने सुरू केली 288 मतदार संघात लढण्याची तयारी - केसीआर
  2. 2000 Note Ban : नोट बंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करण्याची भाजपची पद्धतशीर योजना - धंगेकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.