गोगरामधून भारत-चीनचे सैनिक मागे फिरले, तात्पुरते बांधकामही उद्धवस्त

author img

By

Published : Aug 6, 2021, 7:40 PM IST

India China disengage

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया 4 ते 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दोन्ही देशांचे सैनिक हे त्यांच्या कायमस्वरुपीच्या तळावर पोहोचले आहेत. दोन्ही देशांनी तात्पुरते केलेल्या पायाभूत सुविधा परस्पर सामंजस्याने पडताळणी करून उद्धवस्त केल्या आहेत.

नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यदलातील 12 व्या चर्चेच्या फेरीची फलनिष्पत्ती दिसू लागली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीनच्या सैनिक मागे फिरले आहेत. दोन्ही देशांनी पाँईट 17 ए म्हणजे गोगरा येथील गस्त टप्प्याटप्प्याने, समनव्याने आणि पडताळणी करून थांबविल्याचे भारतीय सैन्यदलाने म्हटले आहे.

दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया 4 ते 5 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. दोन्ही देशांचे सैनिक हे त्यांच्या कायमस्वरुपीच्या तळावर पोहोचले आहेत. दोन्ही देशांनी तात्पुरते केलेल्या पायाभूत सुविधा परस्पर सामंजस्याने पडताळणी करून उद्धवस्त केल्या आहेत. गतवर्षी दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखमध्ये समोरासमोर उभे ठाकले होते. त्यापूर्वी जी स्थिती होती, तशी स्थिती झाल्याचे सैन्यदलाने म्हटले आहे.

हेही वाचा-न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय

दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरूच राहणार-

प्रत्यक्ष ताबारेषेचे दोन्ही देशांकडून कठोरपणे निरीक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये एकतर्फी बदल करण्यात येणार नाही. या पद्धतीने संवेदनशील भागाचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. दोन्ही बाजुंनी चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी बांधिलकी दाखविण्यात आली आहे. पश्चिम भागात प्रत्यक्ष ताबारेषेनजीकच्या राहिलेले वाद सोडविण्यासाठी पुढे चर्चा सुरू ठेवण्यात येणार आहे. आयटीबीपी आणि भारतीय सैन्यदल हे देशाचे सार्वभौमत्व, शांतता आणि समानता ही पश्चिम भागात सीमारेषेनजीक ठेवण्यासाठी संपूर्णपणे वचनबद्ध आहे.

भारत-चीन दोन्ही देशांमधील बैठक ही परस्पर सामजंस्याची

भारत-चीनमधील सैन्यदलामध्ये चर्चेची ऑगस्टमध्ये 12 वी फेरी झाली. ही चर्चेची फेरी विधायक झाल्याचे भारताच्या बाजूने विधायक झाल्याचे दोन्ही देशांच्या संयुक्त निवदेनात म्हटले आहे. भारत-चीन दोन्ही देशांमधील बैठक ही परस्पर सामजंस्याची होती. दोन्ही देशांनी पूर्वसंमतीने आणि प्रोटोकॉलप्रमाणे उर्वरित वाद त्वरित सोडवावेत, असे दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. प्रामाणिक आणि सखोल दृष्टीकोनाची देवाण-घेवाण झाली आहे. दोन्ही देश सीमारेषेवर स्थिरता, शांतता आणि समानता टिकविण्यासाठी परिणामकारक प्रयत्न सुरुच ठेवणार असल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

फेब्रुवारीनंतर भारत-चीनमधील तणाव निवळण्यास सुरुवात-

भारत आणि चीनच्या सैन्यदलामध्ये चुशूल-मोल्डी सीमारेषेवर बैठक झाली. चीन आणि भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची 14 जुलैला डुशान्बे येथे बैठक झाली होती. तर वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशनची भारत-चीन सीमा व्यवहारावर 25 जूनला बैठक झाली होती. फेब्रुवारीनंतर दुसऱ्या टप्प्यात पॅनगाँग त्सो जलाशयाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरून सैनिक मागे परतले होते.

हेही वाचा-कर्नाटकमध्ये आजपासून रात्री 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.