Four Pilgrims Death in Bus Fire : जम्मूमध्ये वैष्णवीदेवी यात्रेकरूंच्या बसला भीषण आग; चार जिवंत जाळले, 22 जण जखमी

author img

By

Published : May 13, 2022, 8:09 PM IST

Updated : May 13, 2022, 8:21 PM IST

four  pilgrims have died in a bus caught

एडीजीपी जम्मू यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कटरा येथून 1.5 किमी अंतरावर खरमलजवळ कटराहून जम्मूकडे जाणाऱ्या लोकल बसला आग लागल्याने ( fire broke out in a bus ) हा अपघात झाला. इतर 22 जळालेल्यांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आधी बसच्या इंजिनला आग लागली. काही वेळातच संपूर्ण बसला आगीने वेढले.

श्रीनगर- वैष्णवीदेवी यात्रेकरूंना ( Vaishno Devi pilgrims death in Katra ) घेऊन कटराहून जम्मूला परतणाऱ्या खासगी बसला भीषण आग लागली. या आगीत चार यात्रेकरुंचा ( 4 pilgrims death in Bus fire ) जिवंत जळून मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत.

एडीजीपी जम्मू यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कटरा येथून 1.5 किमी अंतरावर खरमलजवळ कटराहून जम्मूकडे जाणाऱ्या लोकल बसला आग लागल्याने ( fire broke out in a bus ) हा अपघात झाला. इतर 22 जळालेल्यांवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आधी बसच्या इंजिनला आग लागली. काही वेळातच संपूर्ण बसला आगीने वेढले.

वैष्णवीदेवी यात्रेकरूंच्या बसला भीषण आग

जम्मू-काश्मीरमधील वैष्णवीदेवी यात्रेकरूंनी भरलेल्या बसला भीषण आग लागली. त्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जणांना जळालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

डीजीपी जम्मू ( ADGP Jammu Mukesh Singh ) यांनी सांगितले की, कटरा येथील माता वैष्णवीदेवी मंदिर बेस कॅम्पच्या मार्गावर यात्रेकरूंनी भरलेल्या बसला आग लागली. त्याचवेळी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट केले की, कटरा येथील बस अपघाताची माहिती मिळताच उपायुक्त रियासी (जम्मू आणि काश्मीर) बबिला राखवाल यांच्याशी संवाद साधला आहे. जखमींना नारायणा रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींना आर्थिक आणि शक्य ती सर्व मदत केली जाईल.

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत्रा 29 जणांचा मृत्यू-उत्तराखंडमधील चारधाम यात्रा 2022 मध्ये ज्या प्रकारे मृत्यूच्या घटना तीव्र झाल्या आहेत. त्याबाबत भारत सरकारने राज्याकडून अहवालही मागवला आहे. आतापर्यंत २९ भाविकांचा मृत्यू झाल्याची परिस्थिती आहे. मरण पावलेल्यांमध्ये 30 वर्षांच्या तरुणांपासून ते 75 वर्षांपर्यंतच्या वृद्धांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथमध्ये आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. बद्रीनाथमध्ये 5, गंगोत्रीमध्ये 3 आणि यमुनोत्रीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचाप्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या अस्थिकलशाचे गंगेत विसर्जन, मुलगा राहुल शर्मा म्हणाले..

हेही वाचा-Parrot Missing Report in Police : पोपट पिंजऱ्यातून उडून गेल्याची पोलिसात तक्रार; बस्तर पोलिसांत तक्रार

हेही वाचा-AAP MLA Amanatullah khan : दिल्लीतील आपचे आमदार अमानतुल्ला खान अडचणीत.. दिल्ली पोलिसांकडून गुंड म्हणून घोषणाा

Last Updated :May 13, 2022, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.